गुरुवार, २८ एप्रिल, २०११

माझ्या डोक्यावर फार ओझ असत.....


माझ्या डोक्यावर फार ओझ असत.....
-------------------------------------------------------------------------
                                                                      
    स्लमडॉग मिलेनियरमधिल धारावीच रुप बघितल, वाईट वाटल.
ते साऱ्या जगासमोर मांडल, राग आला पण क्षणभरच कारण,
        ह्यात गुरफटणार कोण? हे अस अधुन मधुन घडतच असत,
             .....माझ्या डोक्यावर फार ओझ असत.
रस्त्यावरच्या अपघातांचे फोटो, टपावरुन प्रवास करणारे प्रवासी,
        अनवाणी पायांनी दुध घालणारा धनगर, 
       ४० डिग्री सेंटीग्रेड तापमानामध्ये रोडरोलरच्या चाकाचे डांबर,
      रॉकेलने पुसणारे हात.हे ही अस्वस्थ करत,पण ह्यात गुरफटणार कोण?
            .....माझ्या डोक्यावर फार ओझ असत.
 यंदा सातवीची स्कॉलरशिप झाली,नववी हा दहावीचा पाया,
        दहावी हा बारावीचा आणि बारावी अ‍ॅडमिशनचा,करीयरचा.
   बापरे! मग काय फीरायचे ते यंदाच, मला ह्याचही प्लॅनिंग करायच असत.
              .....माझ्या डोक्यावर फार ओझ असत.
पाचव्या मजल्यावरच्या हिरॉइनच्या टेरेस फ्लॅटवर चाललेली पार्टी,
        अन तळाशी बी.एम.सी.च्या दिव्यावर अभ्यास करणारी मुल,
       बड्यांच्या युवराजांची नशीली पार्टी,पोलिसांची रेड व सुटका,
       आणि भिक मागण्यासाठी अपंग करण्यात येणारे देशाचे भवितव्य,
       स्विस बॅंकेतिल काळ्या पैश्य़ांचे आकडॆ अन, कष्टकऱ्यांचे बुडणारे          
       फसव्या फायनान्समधील पैसे, सार काही अस्वस्थ करत 
       पण ह्यात गुरफटणार कोण?
                .....माझ्या डोक्यावर फार ओझ असत.
मित्राने हुंडाई घेतली, एकाने तळेगावला हॉलिडे होम, 
        एकाचा महाबळेश्वरला बंगला,मला सारख, सारख धावायच असत,
         मग ह्यात गुरफटाणार कोण?
             .....माझ्या डोक्यावर फार ओझ असत.
हे अस अस्वस्थ होण, अधुन मधुन छातीत दुखण,
       तुमच काय माझ काय सेम असत.
       तुमच्या नसेलही कदाचित, असेलही कदाचित, पण 
            .....माझ्या डोक्यावर फार ओझ असत,
            .....माझ्या डोक्यावर फार ओझ असत.












रविवार, १७ एप्रिल, २०११

संकटमोचनम

                                                                
                रत्नागिरी रेल्वेस्टॆशन, प्लॅटफॉर्म क्र.१, दुपारी १:०० वाजता मांडवी अपने मुंबईला जाण्यासाठी थांबलो होतो, तेवढ्यात सुचना झाली की गाडी १ तास  उशिरा येणार आहे. वाट बघणे क्रमप्राप्त होत. अश्यावेळी वेळ घालवायच हमखास साधन म्हणजे चहा. प्लॅट्फॉर्मच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या टी स्टॉलवर जावून चहा घेण्यासाठी चालत स्टॉलपाशी आलो. सहज लक्ष बाकड्याकडे गेले. तेथे भगवे कपडे घातलेले एक साधूबाबा बसलेले दिसले. त्यांच्याजवळ जावून त्यांना ’बाबाजी चाय पिओगे?’ विचारले तर चलेगा एवढच म्हणून ते हसले.मी स्टॉलवर जावून दोन कप चहा घेतला व त्यांच्याजवळ आलो.चहा घेता घेता आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी म्ह्टल बाबाजी कुछ सुनाओ.ते म्हणाले बेटा तुला एक गोष्ट सांगतो ती माहीती असली तरी शांतपणॆ ऎकून घे, व ते शांतपणॆ सांगु लागले.
             ’प्रभु रामचंद्राचे दुत म्हणून हनुमानजी लंकेला लंकानरेश रावणाला समजावण्यासाठी आले. युद्ध टाळून सितामाईंना रावणाने सोडावे अशी शिष्टाई करायची होती. दरबारामध्ये हनुमान गेले तेव्हा रावण खूप उंचीवर आपल्या सिंहासनावर बसुन होता. हनुमानजींनी आपल्या शेपटीचे वेटोळे केले व रावणाच्या उंचीवर येवून रावणाला प्रभु रामचंद्राचा निरोप सांगीतला’.

              बेटा हा प्रसंग व ह्या पुढील सर्व तुला माहीती असेलच पण एवढ्यावरुन तुला काय वाटते ते सांग.   मी म्हटले बाबाजी हनुमान प्रभु रामचंद्राचे दुत म्हणून गेले होते तेव्हा त्यांचा अपमान होऊ नये म्हणून हनुमानजींनी चमत्कार करुन रावणाच्या उंचीवर जावुन त्याच्याशी वार्तालाप केला असेल. बाबाजी शांतपणे हसले.मी म्हटल बाबाजी काय झाले, तुम्हीच सांगा, तर ते सांगु लागले.
                ’बेटा त्या वेळी प्रभु रामचंद्रांच्या समोरील संकट होत ते म्हणजे लंकानरेश रावण. हनुमानजींनी विचार केला संकट आपल्यापेक्षा उंच, मोठ होता कामा नये. बेटा आपल्या आयुष्यातही असच असत, अनेक छॊटी-मोठी संकट य़ॆत असतात, पण संकटाला कधीच मोठ होऊ द्यायच नाही, नाहीतर आपण त्याखाली दबलेले राहतो. नेहमी संकटापेक्षा वर जावुन विचार कर अनेक सुटकेचे मार्ग तुला आपोआप दिसतील’.
                   बाबाजींच्या विचारांनी  अवाक होत मी त्यांना नमस्कार केला व बोगीच्या दिशेने चालु लागलो.     

गुरुवार, ७ एप्रिल, २०११

जलनिती

 
कीती वर्षे झाली आठवत नाही पण आमच्या गावातून एक कालवा काढण्याचे काम चालु आहे. काम पुर्ण होत नाही आणि कालव्याला पाणीही येत नाही. ह्या अनोख्या जलनिती बाबत थोडेसे .......
कॅनॉल