बुधवार, २३ मार्च, २०११

येता -येता----१

                                                        
गुहागर _ अक्कलकोट गाडी धावतच पकडली . आड्व्या सिटवर जागाहि मिळाली.समोर सर्व सीट्स जवळपास भरलेल्या.बरेच जण माझ्याकडॆ बघून नमस्कार करत होते. अश्या अनोळखी व्यक्ती नमस्कार का करतात म्हणून मी गोंधळून आजुबाजुला बघितले तर लक्श्यात आले की डॊक्यावर स्वामी समर्थांचा फोटो होता व सर्वजण त्याला नमस्कार करत होते.फोटो बघितला, कोणीतरी सप्रेम भेट दिला होता व त्याखाली लिहले होते कॄष्णमुर्ति ज्योतिषि, सर्व समास्यांचॆ निवारण करुन दिले जाईल व त्याखाली स्वत:चा फोन नंबर दिला होता. समर्थांचा फोटो भेट देवून स्वत:चीच जाहिरात जास्त केली होती.
आजकाल हा ट्रेंड्च झालाय़. प्रत्येक भेट ही व्यावाहारिक झालॆय़. वर्तमानपत्रात रोज कोणाची ना कोणाची तरी बातमी येत असते ,मोफत वही वाटप, मोफत फळे वाटप, वाढदिवसाबद्दल देणगी वगैरे पण त्यात देणाऱ्याचा फोटोच मोठा असतो. अश्या अनेक भेटींमागे कारणे वेगळीच असू शकतात, अन्यथा त्याची जाहिरात करण्याची गरज का भासावी? शुभ प्रसंगी दिल्या जाणाऱ्या भेटींचेही हिशोब ठेवून त्याचा परतावा केला जातो. याला सप्रेम भेट म्हणायचे का?
मोठया माणसांचे राहू दे, गेल्याच महिन्यात माझा मुलगा प्रतिक ह्याचा वाढदिवस होता,त्याच्या खरेदीसाठी गेलो असता म्हणाला‘बाबा गिफ़्ट शॉपीमध्ये चला!’ मी कशाला म्हणून विचारले, तर म्हणाला" रिटर्न गिफ़्ट घ्यायचे आहेत. मी कशाला विचारले तर म्हणाला जस्ट फ़ॉरमॅलिटिज अस काहिस बडबडला. गिफ़्ट लगेच परत करायचे असते हे पूढ्च्या पिढीतही रुजू लागलेय. यावरुन भावनेपेक्षा व्यावहारिकता जास्त महत्वाची ठरतेय अस म्हणायचे का? कदाचित म्हणूनच आजकाल भेटीबरोबर सप्रेम भेट न म्हणता शुभेच्छापूर्वक असच जास्त म्हटल जात नसेल?
 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा