आनंदवन भुवनी !!!
भगवान तुम्ही वारंवार सांगितलेत,
‘अत्त दिप भव्’
मी अंधार म्हणत होतो तिथे प्रकाश होता.
कदाचित मला डोळॆ असतील पण नजरेचा अभाव होता.
कॄष्णा तु सांगितलेस,
‘कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन्’
आशाकिरण लुप्त झालेल्यांच्या जीवनात,
स्वकतॄत्वाचा ध्यास निर्माण करणारा विकास तिथे होता.
हे जिझस् तु दयेची देवता
तु सांगुन गेलास सेवा आणि साधना हेच जीवन.
बाबा! आनंदाच्या एका झाडाच्या सावलीच्या शोधात असणाऱ्यांना तुम्ही आनंदवन दिलेत.
तुमचेच बोल शतकानुशतके स्फुर्ती देतील.
आसवांना वेळ नाही, दूःख उधळायास आता’.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा