बा! रामदेवा,सावध तुला देवरामांनी घेरल आहे.
समुद्रमंथनातील विष आता,त्यांच्या हाती आले आहे.
कायदा भले असेल तुमचा पण, व्यवस्था मात्र त्यांची आहे.
साबरमतीच्या वाटेला सुद्धा हिंसाचाराचे कुंपण आहे.
उत्तर त्यांचे द्यायचे असते ज्या प्रष्णांना अर्थ आहे,
नका ताकद खर्च करु आमच्या कानात प्राण आहे.
अत्याचारालाही सीमा असते,त्यांचे शस्त्र तेच आहे.
गवतांचेहि होतील भाले, ही भुमि शहिदांची आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा