लहानपण संगमेश्वर तालुक्यातील एका खेडेगावामध्ये गेले. त्यावेळी तिथे वीज पोचली नव्हती , सूर्या बरोबर प्रकाशाचा स्रोत लुप्त व्हायचा आणि मग कंदील सोबत देऊ लागायचा. आजीच्या खोलीमध्ये आजी बाजल्यावर असायची , वातावरण इतके शांत असायचे की बाहेरील पक्ष्याचे आवाज स्पष्ट ऐकू यायचे. मग आजी या आवाजावरून गोष्टी तयार करून ऐकवायची यात त्या पक्ष्याचे आणि प्राण्यांची मैत्री, गमती अस बरच असायचं . मग दुसऱ्या दिवशी चिमण्या , कावळे , खारुताई दिसली की गोष्टीतील गमती डोळ्यासमोर यायच्या. कधी कधी शेणाचे आणि मेणाचे घर शोधत अनेक झाडे चारही दिशानी बघून व्ह्यायची.
कोनाड्यात दिवा ठेवताना अलगद चूक चूक आवाज त्या मोठ्या घरात ऐकू यायचा ,मग पालीचा शोध सुरू व्हायचा . खरच असा आवाज येतो का? बघा मनात शंकेची पाल चुकचुकली ना?
जेवणाच्या वेळी काका , दादा दिवसभरातील अनेक घटना एकमेकांना सांगायचे यात खैर, किंजळ, आईनं अशी झाडे तर लांडोर ,मोर अश्या प्राण्यांचे वर्णन असायचे . घराच्या बाहेर पडले की नारळ , पोफळीची झाडे , आमराई असे पर्यटन सहज घडत जायचे . पाटाच्या पाण्याचा मार्ग फिरवता फिरवता मुंग्या दिसायच्या. मग त्यांची रांग शोधत त्यांच्या घरांचा शोध घ्यायचा प्रयत्न व्ह्यायचा.
मग तालुक्याच्या ठिकाणी आलो आणि पहिल्यांदा विजेचे दिवे बघितले , सूर्या नंतरच प्रकाश आला आणि अंधारातल्या आजीच्या गोष्टी मागे राहिल्या. सुट्टीत गावाला जाताना मात्र मौज असायची. साधारण नऊ ते दहा किलोमीटर चे अंतर मात्र प्रवास पायी पायी . रस्ता नव्हता त्यामुळे एस टी नाही की गाडी नाही. मग चालत चालत जाताना आमचे थांबे ठरलेले असायचे . वाटेत समोरासमोर दोन डोंगर लागायचे , त्याला मामा भाच्याचे डोंगर म्हटले जायचे , मग एक छोटा ओहळ लागायचा त्याला चिंचेचा पऱ्या म्हणत असत. कोकणात लहान ओढ्याला पऱ्या म्हणतात. तिथे आजूबाजूला छान झाडी होती , सकाळो लवकर निघालं तर पोपटाचे थवे तिथे असायचे . डोंगरातून चालताना माझा गावातील मित्र किती गोष्टी सांगायचा.
श्रावणात शिखरावर शंकराच्या देवळात जाताना बेलाची झाडे लागायची. ओढ्यात पाय धुवून पुढे जाताना तो वाहत्या पाण्याचा स्पर्श ,गंमत वाटायची .
मग गाड्या सुरू झाल्या, टी व्ही आले , विडिओ सेंटर वरती चित्रपट , मग दुचाकी आली , गावचे अंतर वाढले ,वेळेच्या गणितात आपल्या गाडीने प्रवास सुरु झाला आणि हे सारे तुटत गेले.
अरे या तुटण्याला किंती सहज मी या वस्तुंना जबाबदार धरले?
या असतानाही मी हे नाते टिकऊ शकलो असतो हे गेल्या काही दिवसात अधोरेखित झाले पण सवय काय करणार तेव्हा या गोष्टी आल्या आणि एक नाते तुटत गेले...
संतोष पुरोहित
जागतिक पर्यावरण दिन 2020
कोनाड्यात दिवा ठेवताना अलगद चूक चूक आवाज त्या मोठ्या घरात ऐकू यायचा ,मग पालीचा शोध सुरू व्हायचा . खरच असा आवाज येतो का? बघा मनात शंकेची पाल चुकचुकली ना?
जेवणाच्या वेळी काका , दादा दिवसभरातील अनेक घटना एकमेकांना सांगायचे यात खैर, किंजळ, आईनं अशी झाडे तर लांडोर ,मोर अश्या प्राण्यांचे वर्णन असायचे . घराच्या बाहेर पडले की नारळ , पोफळीची झाडे , आमराई असे पर्यटन सहज घडत जायचे . पाटाच्या पाण्याचा मार्ग फिरवता फिरवता मुंग्या दिसायच्या. मग त्यांची रांग शोधत त्यांच्या घरांचा शोध घ्यायचा प्रयत्न व्ह्यायचा.
मग तालुक्याच्या ठिकाणी आलो आणि पहिल्यांदा विजेचे दिवे बघितले , सूर्या नंतरच प्रकाश आला आणि अंधारातल्या आजीच्या गोष्टी मागे राहिल्या. सुट्टीत गावाला जाताना मात्र मौज असायची. साधारण नऊ ते दहा किलोमीटर चे अंतर मात्र प्रवास पायी पायी . रस्ता नव्हता त्यामुळे एस टी नाही की गाडी नाही. मग चालत चालत जाताना आमचे थांबे ठरलेले असायचे . वाटेत समोरासमोर दोन डोंगर लागायचे , त्याला मामा भाच्याचे डोंगर म्हटले जायचे , मग एक छोटा ओहळ लागायचा त्याला चिंचेचा पऱ्या म्हणत असत. कोकणात लहान ओढ्याला पऱ्या म्हणतात. तिथे आजूबाजूला छान झाडी होती , सकाळो लवकर निघालं तर पोपटाचे थवे तिथे असायचे . डोंगरातून चालताना माझा गावातील मित्र किती गोष्टी सांगायचा.
श्रावणात शिखरावर शंकराच्या देवळात जाताना बेलाची झाडे लागायची. ओढ्यात पाय धुवून पुढे जाताना तो वाहत्या पाण्याचा स्पर्श ,गंमत वाटायची .
मग गाड्या सुरू झाल्या, टी व्ही आले , विडिओ सेंटर वरती चित्रपट , मग दुचाकी आली , गावचे अंतर वाढले ,वेळेच्या गणितात आपल्या गाडीने प्रवास सुरु झाला आणि हे सारे तुटत गेले.
अरे या तुटण्याला किंती सहज मी या वस्तुंना जबाबदार धरले?
या असतानाही मी हे नाते टिकऊ शकलो असतो हे गेल्या काही दिवसात अधोरेखित झाले पण सवय काय करणार तेव्हा या गोष्टी आल्या आणि एक नाते तुटत गेले...
संतोष पुरोहित
जागतिक पर्यावरण दिन 2020









